Cm Kisan Yojana Maharashtra

या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे व हि लाभाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने  जमा करण्यात येणार आहे.

आपल्या राज्यातील बहुतांश कुटुंबांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे तसेच राज्यात बहुतांश शेतकरी गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतो. शेतकऱ्यांकडे शेती व्यवसाया व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे कमाईचे साधन नसल्या कारणामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते व त्यामुळे ती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे त्यामुळे शेतकरी शेती करण्यासाठी बँक, वित्त संस्था व साहुकाराकडून जमीन गहाण ठेवून कर्ज घेतात व अहोरात्र मेहनत करून शेती करतात परंतु अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट, दुष्काळ, पूर तसेच शेतात जनावर घुसणे व इतर अन्य कारणामुळे हाथा तोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते व घेतलेले कर्ज फेडू न शकल्यामुळे काही शेतकरी आत्महत्या करतात तसेच सतत होणाऱ्या नुकसानामुळे खूप सारे शेतकरी शेती करण्याचे टाळतात त्यामुळे भविष्यात याचा कृषी क्षेत्रावर मोठा दुष्परिणाम दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची वाढती आत्महत्या सरकारसाठी एक चिंतेचा विषय बनत चालला आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी  विविध योजना राबवित असतात. गेल्या काही वर्षांपासून इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. शेतकरी आपली जमीन गहाण ठेवून शेतीसाठी कर्ज घेतात व कष्ट करून शेती करतात परंतु नैसर्गिक तसेच प्राकृतिक आपत्तीमुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते परिणामी शेतकरी आत्महत्या करतात त्यामुळे घरातील करता पुरुष एकाएकी गेल्यामुळे त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ येते व स्वतःचा उदरनिर्वाह करण्याची समस्या निर्माण होते त्यामुळे राज्यात आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखता येतील. [Cm Kisan Yojana Maharashtra]

वाचकांना विनंती

आम्ही मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात जे कोणी गरीब कुटुंबातील शेतकरी असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावमुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभप्रतिवर्ष 6000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
उद्देश्यशेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

Table Of Content

मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट

  • राज्यातील गरीब शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र चे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे.
  • शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • शेतकऱ्यांना तसेच इतर नागरिकांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र ची सुरुवात करण्यात आली.
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
  • शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे कल्याण करणे. [Cm Kisan Yojana Maharashtra]
Cm Kisan Yojana Maharashtra

मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र चे वैशिष्ट्य

  • मुख्यमंत्री किसान योजना ची सुरुवात महाराष्ट्र सरकार कडून करण्यात आली आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनविनासाठी तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेली हि एक महत्वाची अशी योजना आहे.
  • योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन निर्णय आलेली आहे त्यामुळे अर्जदार शेतकरी घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे शेतकऱ्याला अर्ज करण्यासाठी कोणत्याच सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सदर योजना फायद्याची ठरणार आहे.
  • मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास तसेच त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास व त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. [Cm Kisan Yojana Maharashtra]
  • स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना
  • स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या नागरिकांना सरकार देत आहे 1 लाख रुपयांचे कर्ज त्यासाठी वाचा वसंतराव नाईक कर्ज योजना
  • स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार देत आहे 2.5 लाखाचे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना

Cm Kisan Yojana Maharashtra चे लाभार्थी

  • राज्यातील शेतकरी महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचे लाभार्थी आहेत

मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम

  • महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांना होणारे फायदे

  • मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे व लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
  • योजनेअंतर्गत लाभाची रक्कम शेतकरी कृषी कार्यात करू शकतील.
  • शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल
  • राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील.
  • राज्यातील शेतकरी तसेच अन्य नागरिक शेती करण्यासाठी प्रेरित होतील.
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. [Cm Kisan Yojana Maharashtra]

मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र साठी आवश्यक पात्रता

  • अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र चे नियम व अटी

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री किसान योजना चा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
  • आर्थिक दृष्ट्या श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार शेतकरी अल्प भूधारक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. [Cm Kisan Yojana Maharashtra]

मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदार शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
  • शपथपत्र

मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्ती शेतकरी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार शेतकरी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्राप्त करत असल्यास अशा शेतकऱ्यांचा अर्ज रद्द केला जाईल.
  • एकाच वेळी दोन अर्ज केल्यास बाकीचे अर्ज रद्द केले जातील.
  • अर्जदार शेतकऱ्याने अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल. [Cm Kisan Yojana Maharashtra]
  • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना

Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदार शेकतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जाऊन महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ अर्ज घायचा आहे व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडायची आहेत व सदर अर्ज कार्यालय जमा करायचा आहे.
  • अशा प्रकारे तुमची महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण सध्या महाराष्ट्र सरकारने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरु  करे पर्यंत तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सरकार जशी अर्ज प्रक्रिया सुरु करेल त्याची संपूर्ण माहीत माहीत आम्ही या आर्टिकल मध्य अपडेट करू त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे कि काही वेळाने या आर्टिकल ला भेट देत रहा. [Cm Kisan Yojana Maharashtra]

Telegram GroupJoin
शेतकरी योजना महाराष्ट्र 2023 अर्जClick Here

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले या योजनेअंतर्गत काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.