राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली आपले जीवन जगत असतात त्यांच्याजवळ रोजगाराचे स्थायी साधन नसल्यामुळे त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करता येत नाहीत तसेच आपल्या मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी देखील ते असमर्थ असतात. त्यामुळे बहुतांश युवक/युवती हे शिकण्याची इच्छा असून सुद्धा घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात व त्यामुळे त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होत नाही. आज देखील समाजात मुलींना मुलांपेक्षा कमी महत्व दिले जाते त्यामुळे त्यांची भ्रूणहत्या केली जाते तसेच त्याच्या शिक्षणाला देखील जास्त महत्व दिले जात नाही व मुलींना उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवले जाते
काही कुटुंबे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या व्याज दरावर कर्ज घेतात व कर्ज वेळेवर फेडू न शकल्यामुळे त्यांना खूप साऱ्या अडचणींना तोंड द्यावे लागते.या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी Savitribai Phule Scholarship सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
राज्यातील गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी तसेच त्यांना सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून रहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. [Savitri Bai Phule Scholarship]
वाचकांना विनंती
आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव | Savitribai Phule Shishyavrutti Yojana |
लाभार्थी | राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी |
लाभ | 6,000/- रुपये ते 18,000/- रुपयांपर्यंत अर्थसहाय्य |
उद्देश्य | शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
Savitri Bai Phule Scholarship चे उद्दिष्ट
- Savitribai Phule Yojana Maharashtra अंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे आहे.
- या शिष्यवृत्तीद्वारे देऊ केलेल्या दीर्घकालीन आर्थिक सहाय्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी पाया घालण्यात मदत करणे आहे.
- शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची संधी प्रदान करणे.
- राज्यातील विद्यार्थ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यातील विद्यार्थ्यांचे या योजनेच्या सहाय्याने जीवनमान सुधारणे.
- राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 6,000/- रुपये ते 16,000/- रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती प्रदान करणे जेणेकरून विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. [Savitri Bai Phule Scholarship]
Savitribai Phule Shishyavrutti ची वैशिष्टये
- महाराष्ट्र शासनाच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ शैक्षणिक विभाग पुणे यांच्याद्वारे सुरु करण्यात आलेली राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
- या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार विद्यार्थ्यास कोणत्याच कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुणे विद्यापीठाने महाविद्यालये/विद्यापीठ विभागामध्ये अव्यवसायिक अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पदवी व पदव्युत्तर अव्यवसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल घटक, गुणवत्ताधारक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीची च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केले जाते.
- शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यापीठाकडून सदर अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत सोबत जोडलेल्या नियम व अटीनुसार अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 10 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 5 विद्यार्थीनीस गुणानुक्रमे 5,000/- रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल. [Savitri Bai Phule Scholarship]
शासनाच्या इतर योजना
- सरकार विद्यार्थ्यांना देत आहे विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती त्यासाठी वाचा महाडीबीटी शिष्यवृत्ती
- सरकार विद्यार्थ्यांना देत आहे मोफत टॅबलेट त्यासाठी वाचा महाज्योती फ्री टॅबलेट योजना
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सरकार करत आहे मोफत सायकल चे वाटप त्यासाठी वाचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
- विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास सरकार देत आहे 1.50 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज त्यासाठी वाचा शैक्षणिक कर्ज योजना
सावित्रीबाई फुले योजना महाराष्ट्र चे नियम व अटी
- महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त 10 व अव्यवसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त 05 विद्यार्थीनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेसाठी पात्र राहतील.
- पात्र विद्यार्थीनीस 5,000/- रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल.
- विद्यार्थीनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा पेक्षा जास्त नसावे यासाठी संबंधित तहसिलदाराचा दाखला आवश्यक राहील,
- सदरचे अर्थसहाय्य पात्र विद्यार्थिनीस संपूर्ण पदवी आणि पदव्युत्तर काळात एकदाच देण्यात येईल.
- विद्यार्थिनींने मागील लगतच्या परीक्षेत किमान 50 टक्के गुण संपादित केलेले असावेत. 50 टक्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थीनींचा गुणानुक्रमे विचार करण्यात येईल.
- महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थीनीने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थीनीने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा.
- विद्यार्थीनीची नियमित अभ्यासक्रमात किमान 75 टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील. या संदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील,
- विद्यार्थीनीस या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी स्विकारता येणार नाही.
- विद्यार्थीनीस गैरशिस्त/नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
- अर्थसहाय्यासाठी विद्यार्थीनीच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर इतर उपक्रमातील सहभाग उदा. क्रीडा, समाजसेवा, कला इ. विचारात घेण्यात येईल.
- विद्यार्थीनीने त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बॅकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)
- शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांनीस सदर योजना लागू राहणार नाही. याबाबत संबंधित विद्यार्थीनीने आणि प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील. [Savitri Bai Phule Scholarship]
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना
- आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून ही अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 20 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 10 विद्यार्थ्यास गुणानुक्रमे 3,000/- रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल.
- आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालये/विद्यापीठ विभागामध्ये अव्यवसायिक अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे. [Savitri Bai Phule Scholarship]
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजनेचे नियम व अटी
- महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त 20 व अव्यवसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमास जास्तीत जास्त 10 विद्यार्थ्यां सदर योजनेसाठी पात्र राहतील.
- पात्र विद्यार्थ्यास पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 3000/- रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
- विद्यार्थ्याच्या पालकांचे (कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. यासाठी संबंधित तहसिलदाराचा दाखला आवश्यक राहील.
- विद्यार्थ्याने मागील लगतच्या परीक्षेत किमान 65 टक्के गुण संपादित केलेले असावेत.
- महाविद्यालय/विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्याने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान 75 टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील.या संदर्भात प्राचार्यानी दाखला देणे आवश्यक राहील.
- विद्यार्थ्याने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा.
- विद्यार्थ्यास या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी स्विकारता येणार नाही.
- विद्यार्थ्यास गैरशिस्त/नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
- विद्यार्थी भारतीय नागरिक असावा. त्यासाठी नागरिकत्वाचा सांक्षाकित दाखला जोडणे आवश्यक राहील.
- विद्यार्थ्याने त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बँकेचे नाव, पत्ता,खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)
- संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य हे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त किंवा प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यताप्राप्त असावेत.
- सदरचे अर्थसहाय्य पात्र विद्यार्थ्यास संपूर्ण अभ्यासक्रमात एकदाच देण्यात येईल.
- शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू राहणार नाही. याबाबत संबंधित विद्यार्थ्याने आणि प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील. [Savitri Bai Phule Scholarship]
शासनाच्या इतर योजना
- शिक्षण पूर्ण करण्यासाठी सरकार देत आहे 3000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
- सरकार युवकांना देत आहे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण त्यासाठी वाचा युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
- सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकार देत आहे निर्वाह भत्ता त्यासाठी वाचा सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना
- स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना
- राज्यातील निराधार व्यक्तींना सरकार दरमहिना देत आहे 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा संजय गांधी निराधार योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
मागासवर्गीय घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामार्फत सदर शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित केलेली आहे. सदर योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू असून पदवी व पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज (सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील एकत्रित) गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील. त्यापैकी 48% मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा एकत्रित गुणवत्तेनुसार व उर्वरित 52% विद्यार्थ्यांचा त्या त्या प्रवर्गासाठी लागू असलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार गुणानुक्रमे अर्ज विचारात घेतले जातील.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहील. [Savitri Bai Phule Scholarship]
पदवी अभ्यासक्रम
शिष्यवृत्ती रक्कम | विद्यार्थी संख्या | |
कला | 6000/- रुपये | 470 |
वाणिज्य | 6000/- रुपये | 470 |
विज्ञान | 10,000/- रुपये | 470 |
पदव्युत्तर अभ्यासक्रम
शिष्यवृत्ती रक्कम | विद्यार्थी संख्या | |
कला | 8000/- रुपये | 300 |
वाणिज्य | 8000/- रुपये | 300 |
विज्ञान | 16,000/- रुपये | 300 |
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना नियम व अटी
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लाग राहील.
- सदरच्या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतेही अट राहणार नाही केवळ गुणवत्ता हाच निकष राहील.
- मागील लगतच्या परिक्षेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी किमान 60 टक्के गुण संपादित केलेले असावेत.
- पात्र विद्यार्थ्यांचे वय पदवी अभ्यासक्रमाकरीता 25 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता 30 पेक्षा जास्त नसावे.
- सदर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विहित केलेल्या विद्यार्थी संख्येनुसार देण्यात येणार असून त्यापैकी 48 टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार (मागासवर्ग प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्याची एकत्रित गुणवत्ता विचारात घेऊन) व उर्वरित ५२ टक्के गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्या त्या प्रवर्गासाठी शासनाने विहित केलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार शिष्यवृत्ती लाभ दिला जाईल.
- विद्यार्थ्याने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा. [Savitri Bai Phule Scholarship]
- महाविद्यालय/विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्याने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमात किमान 75 टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील यासंदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील.
- सर्व अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाईल.
- विद्यार्थ्यास गैरशिस्त/नैतिकता/परिक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
- विद्यार्थ्याने त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बँकेचे नाव, पत्ता, खाते क्र. (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)
- संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य हे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त किंवा प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यताप्राप्त असावेत.
- सदरचे अर्थसहाय्य पात्र विद्यार्थ्यास संपूर्ण अभ्यासक्रमात एकदाच देण्यात येईल.
- शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू राहणार नाही, याबाबत संबंधित विद्यार्थ्याने आणि प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील. [Savitri Bai Phule Scholarship]
शासनाच्या इतर योजना
- स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी सरकार देत आहे 25 लाखांपर्यंत कर्ज त्यासाठी वाचा मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
- विधवा महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनविण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
- गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक दृष्ट्या बळकट बनविण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे माझी कन्या भाग्यश्री योजना
- गरोदरपणात महिलांना पोषण आहार मिळावा त्यासाठी सरकार देत आहे 6000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
- मुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रबळ बनविण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे किशोरी शक्ती योजना
महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठामार्फत महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. पदवी व पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज (सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील एकत्रित) गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहील.
पदवी अभ्यासक्रम
| शिष्यवृत्ती रक्कम | विद्यार्थी संख्या |
कला | 6000/- रुपये | 470 |
वाणिज्य | 6000/- रुपये | 470 |
विज्ञान | 10,000/- रुपये | 470 |
पदव्युत्तर अभ्यासक्रम
| शिष्यवृत्ती रक्कम | विद्यार्थी संख्या |
कला | 8000/- रुपये | 300 |
वाणिज्य | 8000/- रुपये | 300 |
विज्ञान | 16,000/- रुपये | 300 |
महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना नियम व अटी
- महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना अव्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली असून
- योजनेसाठी उत्पन्नाची कोणतेही अट राहणार नाही केवळ गुणवत्ता हाच निकष राहील.
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने मागील लगतच्या परीक्षेत किमान 70 टक्के गुण संपादित केलेले असावेत.
- पात्र विद्यार्थ्यांचे वय पदवी अभ्यासक्रमाकरिता 23 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता 25 पेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान 75 टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील.या संदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील.
- महाविद्यालय/ विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्याने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्याने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा.
- विद्यार्थ्यास गैरशिस्त / नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
- विद्यार्थ्याने त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)
- विद्यार्थी भारतीय नागरिक असावा. त्यासाठी नागरिकत्वाचा साक्षांकित दाखला जोडणे आवश्यक राहील.
- संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य हे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त किंवा प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यताप्राप्त असावेत.
- शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू राहणार नाही. याबाबत संबंधित विद्यार्थ्याने आणि प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील. [Savitri Bai Phule Scholarship]
स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना (पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यासाठी)
विद्यार्थ्यांना कोणत्या न कोणत्या कारणाने नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी बरेच विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल या उद्देशाने शैक्षणिक वर्ष 2020-21 पासुन नव्याने सदर योजना सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेचा लाभ सरसकट पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या एकुण 32,000 विद्यार्थ्यास गुणवत्तेनुसार 1000/- रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल. [Savitri Bai Phule Scholarship]
स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना नियम व अटी
- स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना व्यवसायिक व अव्यवसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश
- घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार लागू राहील.
- पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या चारही विद्याशाखेतील प्रत्येकी 8000 विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार 1000/- रुपयांप्रमाणे एकुण 32,000 विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
- महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्याने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान 75 टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील. या संदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील.
- पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थी म्हणून मा. प्राचार्य/विद्यापीठ विभागप्रमुख यांनी शिफारस करणे आवश्यक राहील.
- विद्यार्थ्यास या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी स्विकारता येणार नाही.
- विद्यार्थ्यास गैरशिस्त / नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
- विद्यार्थ्याने त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)
- विद्यार्थ्याने आणि संबंधित प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील. [Savitri Bai Phule Scholarship]
शासनाच्या इतर योजना
- स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार देत आहे 2.5 लाखाचे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना
- नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे एक नवीन योजना त्यासाठी वाचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
- स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे 10 लाखाचे कर्ज त्यासाठी वाचा महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
- सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना
- घराच्या छतावर सोलर बसविण्यासाठी सरकार देत आहे 40 टक्के अनुदान त्यासाठी वाचा रुफटॉप सोलर योजना
सावित्रीबाई फुले योजना महाराष्ट्र अंतर्गत महत्वाच्या बाबी
- वर उल्लेख केलेल्या शिष्यवृत्ती/अर्थसहाय्य योजनाकरीता विहित नियम व अटी विचारात घेऊन पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक असून आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत Upload करावीत,
- विहित केलेल्या नियमानुसार विद्यार्थी दोन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र असल्याने एका पेक्षा जास्त शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचा असल्यास विध्यार्थ्याला एकाचवेळी अर्जातील योग्य ते दोन पर्याय निवडता येईल.
- विद्यार्थ्यांनी ऑनलाईन (Online) पध्दतीने सादर केलेल्या अर्जातील माहिती संबधित महाविद्यालय/विद्यापीठ विभाग काटेकोरपणे छाननी करून ऑनलाईन (Online) पध्दतीने विद्यापीठास विहित मुदतीत सादर करतील.
- वरील शिष्यवृत्ती/अर्थसहाय्य योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या वेळेत ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज करावा.
- विद्यापीठ विभाग/महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांचे अर्ज (Hard Copy) स्वीकारले जाणार नाहीत.
- महाविद्यालय/विद्यापीठ विभाग यांनी विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज तपासुन अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरीत ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाकडे सादर करण्याची प्रक्रिया करतील.
- विद्याथ्यांनी ऑनलाईन माहिती भरताना विद्यार्थ्याने दिलेली बँकेची माहिती अचुक व काळजीपूर्वक भरावी.
- ऑफलाईन अर्जाचा शिष्यवृत्ती/अर्थसहाय्य योजनेसाठी विचार केला जाणार नाही. [Savitri Bai Phule Scholarship]
सावित्रीबाई फुले योजना अंतर्गत महत्वाच्या सुचना
- उपरोक्त शिष्यवृत्ती /अर्थसहाय्य योजनेसाठी विहित केलेल्या तरतुदीनुसार नियम व अटीची पूर्तता करीत असलेल्या विद्याथ्यांनीच अर्ज करावेत.
- शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांनीस सदर योजना लागू राहणार नाही.
- विहित केलेल्या शैक्षणिक गुणांच्या टक्केवारीपेक्षा कमी गुण व A.T.K.T असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नयेत.
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना फक्त मुलींसाठी असून मुलांनी अर्ज करू नयेत.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करू नयेत.
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना या दोन्ही शिष्यवृत्तीपैकी पदवी अभ्यासक्रमासाठी फक्त एकाच वेळी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी फक्त एकाच वेळी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना व महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना या दोन्ही शिष्यवृत्तीपैकी पदवी अभ्यासक्रमासाठी फक्त एकाच वेळी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी फक्त एकाच वेळी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल.
- वरील शिष्यवृत्ती/अर्थसहाय्य योजनेचा फायदा विद्यार्थ्यास संपुर्ण पदवी काळात एकदाच आणि पदव्युत्तर काळात एकदा दिला जात असल्याने ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला असेल अशा विद्याथ्यांनी पुन्हा अर्ज करू नयेत.
- विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना त्यांना मिळालेल्या ग्रेड पॉईट चा उल्लेख न करता टक्केवारी मध्ये उल्लेख करावा.
- विद्यार्थ्यांनी (Online) माहिती भरताना अचुक व परिपुर्ण भरावी.
- विद्यार्थ्याचे फक्त राष्ट्रीयकृत बँकेतच बचत खाते असावे.
- विद्यार्थ्यांनी बँकेची माहिती भरताना स्वत:चे खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेची अद्ययावत माहिती अर्जामध्ये व्यवस्थितरित्या नमुद करावी. पालकांची अथवा इतर व्यक्तीचा बँक खाते शिष्यवृत्तीसाठी विचारात घेतले जाणार नाही.
- ऑनलाईन (Online) अर्जासोबत विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करावीत इतर कोणतेही कागदपत्रे Upload करू नये.
- ऑनलाईन (Online) अर्जासोबत Upload करावयाची आवश्यक कागदपत्रे
- विद्यार्थ्यांचे मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत
- वार्षिक उत्पन्नाचा तहसिलदाराने दिलेला दाखला (संतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना व “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना साठी आवश्यक)
- जातीचा दाखला राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक )
- राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत खातेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत
Savitribai Phule Yojana चे फायदे
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना च्या सहाय्याने विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
- विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि शिक्षणासाठी कोणाकडून जास्त व्याजाने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी सशक्त तसेच आत्मनिर्भर बनतील.
- राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल.
- या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून भविष्यात स्वतःसाठी चांगली नोकरी मिळवू शकतील तसेच स्वतःचा उद्योग सुरु करून राज्यात बेरोजगार नागरिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू शकतील.
- या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःचा सर्वांगीण विकास करतील. [Savitri Bai Phule Scholarship]
Krantijyoti Savitribai Phule Scholarship अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- मार्कलिस्ट
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्न दाखला
- पुरग्रस्त/दुष्काळग्रस्त/आपत्तीग्रस्त विभागप्रमुख/प्राचार्य शिफारस प्रमाणपत्र
शासनाच्या इतर योजना
- जेष्ठ नागरिकांना सरकार देत आहे दरमहिना 1500/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा श्रावणबाळ अनुदान योजना
- स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज त्यासाठी वाचा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
- शौचालय बांधण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा शौचालय अनुदान योजना
- राज्य सरकार महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी देत आहे कर्ज त्यासाठी वाचा महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
- राज्य सरकार ग्रामीण भागातील कुटुंबांना देत आहे मोफत चूल त्यासाठी वाचा निर्धूर चुल वाटप योजना
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर New User वर क्लिक करून Login Id आणि Password तयार करावा लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या Username आणि Password टाकून लॉगिन करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला Apply For scholarship बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुम्ही भरलेला अर्ज दिसेल त्याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे.
- अशा प्रकारे तुमची सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [Savitri Bai Phule Scholarship]
Telegram Group | Join |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Savitribai Phule Scholarship Contact | P. G. Admission Section, Savitribai Phule Pune University, Pune – 411 007. |
scholarship[at]pun[dot]unipune[dot]ac[dot]in |
सारांश
आम्ही आशा करतो कि आपल्याला Savitribai Phule Shishyavrutti Yojana ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Savitri Bai Phule Scholarship]