Nirdhur Chul Vatap Yojana

केंद्र सरकार तसेच सर्व राज्ये आपआपल्या राज्यात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करत असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत असते त्यासाठी महाप्रीत द्वारे महाराष्ट्रातील सर्व 38 जिल्यांतील रहिवाश्यांकरिता सदिच्छेने विनामूल्य पर्यावरणीय अनुकूल निर्धूर चुल वाटप अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

उज्ज्वला योजनेतून गरीब कुटुंबांना मोफत गॅस दिल्यानंतर आता शासनाकडून निर्धूर चूल वाटप करण्यात येणार आहे यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडर च्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश महिलापुन्हा चुलीकडे वळत आहेत तसेच ज्या कुटुंबांकडे गॅस नाही ते चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण निर्माण होते व चुलीवर जेवण बनवताना निर्माण होणारा धूर श्वसनाद्वारे महिलांच्या शरीरात जाऊन त्यांना दमा, खोकला सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. तसेच चुलीवर जेवण बनविण्यासाठी लाकडांची गरज भासते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल तोड केली जाते व जंगल तोडीमुळे पर्जन्यमानावर याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम परिणाम होतो तसेच जंगल तोडीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून न राहिल्यामुळे विहिरी आटत चालल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने निर्धूर चुल वाटप योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. [Nirdhur Chul Vatap Yojana]

या अभियानाअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीतील पात्र कुटुंबाना निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप करण्यात येईल.

वाचकांना विनंती

आम्ही निर्धूर चुल योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी अनुसूचित जातीतील कुटुंबे असतील जे निर्धूर चुल योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावनिर्धूर चुल योजना
विभागसमाज कल्याण विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील अनुसूचित कुटुंबे
लाभनिर्धूर चूल वाटप
उद्देशवायू प्रदूषण कमी करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Nirdhur Chul Vatap Yojana चा उद्देश

  • राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील कुटुंबाना निर्धूर चुल वाटप करने हा निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यात वायू प्रदूषण कमी करने हा या योजनेचा उद्देश आहे.
  • ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य अबाधित राखणे हे निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हे निर्धूर चुल वाटप अभियान चे उद्दिष्ट्य आहे.
  • राज्यात जंगलतोड थांबविने हा या योजनेचा उद्देश आहे.
  • महिलांचे जीवनमान सुधारणे.
  • निर्धूर चुल वाटप योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
  • महिलांना आधुनिक तंत्रज्ञाना सोबत जोडणे.
  • महिलांचे जीवनमान सुधारणे. [Nirdhur Chul Vatap Yojana]
Nirdhur Chul Vatap Yojana

निर्धूर चुल वाटप योजना चे वैशिष्ट्य

  • निर्धूर चुल वाटप योजना महाप्रीत द्वारे सूरु करण्यात आली आहे.
  • राज्यातील ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली निर्धूर चुल वाटप योजना एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.
  • राज्यात वायुप्रदूषण थांबवण्यास ही योजना महत्वपूर्ण ठरेल.
  • निर्धूर चूल वाटप योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
  • राज्यात जंगलतोडीस आळा घालण्यासाठी ही योजना महत्वाची ठरेलं.
  • निर्धूर चुल वाटप अभियान अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी कुठल्याही कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही. अर्जदार आपल्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
  • या योजनेअंतर्गत महिला सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल.
  • निर्धूर चूल योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची स्थिती आपल्या मोबाईल च्या सहाय्याने वेळोवेळी जाणून घेऊ शकतो.
  • निर्धूर चूल वाटप योजनेअंतर्गत मिळणारी चूल निशुल्क आहे त्यामुळे लाभार्थ्याला काहीच रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.
  • या योजनेच्या सहाय्याने महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यास मदत होईल. [Nirdhur Chul Vatap Yojana]
  • राज्य सरकार देत आहे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना
  • सरकार गटई कामगारांना देत आहे मोफत पत्र्याचे स्टॉल त्यासाठी वाचा गटई स्टॉल योजना

निर्धूर चुल वाटप योजना चे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातींचे कुटुंब निर्धूर चुल वाटप अभियानाचे लाभार्थी आहेत.
Nirdhur-Chul-Yojana

निर्धूर चुल वाटप योजना चा लाभ

  • निर्धूर चुल वाटप अभियाना अंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीतील कुटुंबाना निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप करण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • महिलांचे जीवनमान सुधारेल.
  • महिला स्वावलंबी बनतील.
  • महिलांचे पारंपरिक पद्धतीने जेवण बनवण्याच्या पद्धतीपासून मुक्तता होईल.
  • निर्धूर चुल वाटप योजनेच्या सहाय्याने राज्यात वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
  • चुलीसाठी होणारी जंगलतोड थांबेल परिणामी पर्जन्यमान सुधारेल तसेच जंगलतोड थांबल्यामुळे जमिनीत पाण्याचा ओलावा टिकून राहील व नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • चुलीच्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम सुधारण्यास मदत होईल.
  • या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या चुलीमुळे लवकर जेवण बनवून होईल.
  • महिलांना आधुनिकीकरणासोबत जोडण्यास मदत होईल. [Nirdhur Chul Vatap Yojana]

निर्धूर चुल वाटप योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.

निर्धूर चुल वाटप योजना चे नियम व अटी

  • निर्धूर चुल वाटप योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील कुटुंबानाच घेता येईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबाना निर्धूर चुल वाटप अभियानाचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार हा अनुसूचित जाती मधील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे LPG गॅस कनेक्शन नसावे.
  • अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु निर्धूर चुल योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा परिस्थितीत त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • निर्धूर चुल वाटप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनुसूचित जातीच्या कुटुंबाला अर्ज करने आवश्यक आहे.
  • अर्जदाराला अंतिम तारखेच्या आत अर्ज करने आवश्यक आहे. [Nirdhur Chul Vatap Yojana]
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना
  • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना
  • सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

निर्धुर चूल वाटप योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जात संपूर्ण माहिती भरली नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्जात खोटी माहिती भरली असल्यास
  • अर्जदार अनुसूचित जातीमधील नसल्यास
  • अर्जदाराकडे LPG गॅस कनेक्शन असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • एकाच वेळी 2 अर्ज केल्यास
  • अर्जदाराने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत चूल मिळवली असल्यास. [Nirdhur Chul Vatap Yojana]

निर्धूर चूल योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • मोबाईल नंबर 
  • ई-मेल आयडी
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शपथ पत्र

निर्धूर चुल वाटप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

पहिले चरण

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या महाप्रीत पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर महाप्रीत वर क्लिक करायचे आहे.
Nirdhur Chul Vatap Yojana Home Page

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामंध्ये तुम्हाला Latest Notices मध्ये Clean Cooking Cookstoves Distribution वर क्लिक करायच आहे.
Nirdhur Chul Vatap Yojana Notice

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या अटी वाचायच्या आहेत.

दुसरे चरण

  • आता तुम्हाला येथे क्लिक करायचे आहे आणि तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे
Nirdhur Chul Vatap Yojana Application Form

  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [Nirdhur Chul Vatap Yojana]
Telegram GroupJoin
शासनाची अधिकृत वेबसाईटClick Here
निर्धूर चुल वाटप योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठीClick Here
Biomass Stove Online FormClick Here
Nirdhur Chul Yojana FormClick Here
Biomass Stove Scheme Online FormClick Here
पत्ताठाकरसी  हाऊस ,
दुसरा  मजला,
जे . एन . हरडिया  रोड ,
बॅलार्ड  इस्टेट ,
मुंबई-400 001
 ———————
जुहू सुप्रीम शॉपिंग कॉम्प्लेक्स, 
रोड क्रमांक 9,
गुलमोहर क्रॉस रोड,
जे व्ही पी डी,  जुहू ,
मुंबई 400 049
दूरध्वनी क्रमांक022-22621934
022-26200351
022-26202852
Emailregionofficemumbai21[at]gmail[dot]com
  • स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार देत आहे 2.5 लाखाचे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना
  • स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना

सारांश

आशा करतो कि निर्धूर चुल वाटप योजना अंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले योजनेअंतर्गत काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Nirdhur Chul Vatap Yojana]